संदर्भ : काही दिवस आम्ही पाऊल ट्रेकर्सची मंडळी गायमुख किल्ल्याबद्दल माहिती संपादन करण्याचा प्रयत्न करत अहोत. महेश सावंत , धवल भंगाळे , श्रेयस हंचाटे , रमाकांत म्हात्रे , रोहन भगत , सचिन लांडे , विग्नेशा पटेल ह्यांनी अनेक गोष्टी नमूद केल्या . श्री. सदाशिव टेटविलकर ह्यांच्या " दुर्गासंपदा ठाण्याची " ह्या पुस्तकाचा आम्हाला खूप उपयोग झाला आहे . हा एक पोर्तुगीज कालीन किल्ला असू शकतो . " दुर्गासंपदा ठाण्याची " ह्या पुस्तकात गायमुख किल्ला हा " गायमुख गढी " ह्या नावाने नोंद केला आहे . ठाणे किनारी लगत असणाऱ्या १२ किल्य्यांमध्ये ह्या किल्ल्याचा समावेश आहे.
सध्या किल्ल्याची स्थिती पाहून त्याचे संवर्धन होऊ शकते का ह्या बद्दल आम्ही विचार करत आहोत . सध्या पूर्वार्ध लिहित आहे, श्री कृपेणे जर किल्ल्याच्या संवर्धनाबद्दल काही करता आले तर उत्तरार्धात अजून माहितीची नोंद नक्कीच करेन . गायमुख किल्ल्याच्या भेटी वेळी आलेला अनुभव खाली नमूद करत आहे .
गायमुख किल्ला : घोडबंदर रोड , ठाणे :Gaimukh Fort - Ghodbandar Road , Thane
दिनांक : २७ मार्च २०१६ , रविवार
ठाणे जिल्ह्याने अनेक ऐतिहासिक स्थित्यंतरे पाहिली आहेत आणि त्या स्थित्यंतरांचे साक्षीदार आजही आपणास पहावयास मिळतात. काही किल्ले सुस्थितीत आहेत तर काही किल्ले आपल्या शेवटच्या घटका मोजत आहेत . माहितीचा आभाव , इतिहासातील दुर्मिळ नोंदी , छोटे आकारमान आणि जनमानसातील ऐतिहासिक वास्तुं विषयीची उदासीनता हे घटक काही किल्ल्यांच्या दुरावस्थेला कारणीभूत ठरत आहेत . अश्याच काळाच्या ओघात नष्ट होत चाललेल्या " गायमुख किल्ल्याला " भेट देण्याचा योग आला .
ठाणे खाडी परिसरात कल्याण हे महत्वाचे बंदर होते . त्या मार्गे चालणारा व्यापार आणि बंदरांच्या संरक्षणासाठी घोडबंदर , नागला बंदर आणि गायमुख किल्ले बांधण्यात आले . चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांना हरवून घोडबंदर किल्ला जिंकला अशी ठोस माहिती आपणास मिळते . परंतु जवळच खाडीपट्टीला लागून असणाऱ्या गायमुख किल्ल्याचे अस्तित्व हे फारश्या लोकांना माहिती नाही हे एक कटू सत्य आहे .
धवलने ह्या किल्ल्यांची माहिती काढली तेव्हा तिथे काहीही नाही असे ऐकिवात आले . मग आम्ही तिथे भेट द्यायची ठरविले ते त्या किल्ल्यांचे अस्तित्व शोधण्यासाठी !
गायमुख ! ठाणे - बोरीविलीला जोडणाऱ्या घोडबंदर हम रस्त्यावरील खाडी किनारीचे एक गाव !
जागनाथ महादेव मंदिरामुळे हे ठिकाण ठाण्यामध्ये तसे प्रसिद्ध आहे . या मंदिरापासूनच हाकेच्या अंतरावर भग्न आणि दुर्लक्षित अवस्थेतील एक किल्ला आहे… " गायमुख किल्ला " .
गायमुख गावात उतरल्यावर आम्ही रस्त्याशेजारील दुकान मालक आणि काही लोकांना किल्ल्या विषयी विचारले. पण त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सर्वच सांगून जात होते कि त्यांना किल्ल्याबद्दल काही माहिती नाही . किल्ला खाडी लगत असावा असा अंदाज घेऊन खाडी किनारी आलो .लाकडी नौका उभ्या असलेल्या खाडी किनारी आम्हाला पाहता आले ते फिडलर खेकडे आणि मडस्कीपर ! तिथे किल्ल्यासारखे बांधकाम दिसले पण लवकरच समजले कि ती फक्त भरती पासून वाचवण्यासाठी बांधलेली तटबंदी आहे .
आम्ही अंदाज बांधला कि मूळ स्थानिक लोक आपल्याला पक्के सांगू शकतील कि किल्ला कोणत्या दिशेस आहे ! एका वयस्कर आजींनी आम्हाला ठामपणे सांगितले कि पुढच्या वळणावर किल्ला आहे. त्यांच्या मुलाने ही ह्या गोष्टीला सहमती दिली आणि आम्ही त्या वळणावर आलो ! एक पडीक वास्तू नजरेस दिसली . मनात आले कि हाच किल्ला असणार पण त्याकडे पाहून लगेच अनुमान लावणेही चुकीचे ठरेल अशी तिची अवस्था होती . सचिनने त्या वास्तूला खेटून असलेल्या आणि गेली ६ वर्ष त्याच जागेवर ठाण मांडलेल्या एका रसवंती दुकानात केलेले संभाषण असे होते
सचिन : " यहा कोई किला है क्या ? " .
रसवंती दुकानाची मालकीण : " किला ? इधर कौनो किला नाही है ! "
सचिन : " ये बाजू मे क्या है ? "
रसवंती दुकानाची मालकीण : " मालूम नाही , पुराना घर है और पिछे घाट है "
मी म्हणालो : " क्या है पिछे ? "
रसवंती दुकानाची मालकीण : " घाट है घाट !!! "
तात्पर्य : आम्ही पुन्हा निराश ! पक्की माहिती न मिळाल्याने विग्नेशा आणि अनिकेत म्हणाले कि चला घाट तरी पाहू .
घाटाजवळ चमत्कार घडला असे म्हणणे वावगे ठरणार नाही . ती पडीक वास्तू किल्लाच आहे असा दुजोरा तिथे पाणी भरत असणाऱ्या एका वयस्क काकूंनी दिला . आमचे बोलणे चालू असतानाच एक वयस्क गृहस्थ तिथे आले आणि त्यांनी खूप चांगली माहिती सांगितली . गायमुख हा किल्ला सागरी व्यापार आणि वाहतूक नियंत्रणासाठी बांधला होता . कर वसुली साठी हि त्याचा उपयोग केला जाई . घोडबंदर रस्ता रुंदीकरण करताना किल्ल्याचा काही भाग नष्ट झाला असे ते म्हणाले . किल्ल्याच्या बाजूला एक पाण्याचा स्त्रोत होता आणि ते पाणी एका गायमुखातून बाहेर यायचे म्हणून त्या गावास आणि किल्ल्यास गायमुख असे नाव पडले . पाण्याचे ते टाके आता अस्तित्वात नाही पण त्या काकांनी आम्हाला ती जागा दाखवली जिथे पाण्याचे टाके होते . वयाची ४० वर्ष येथे व्यथित केलेल्या काकांची आणि किल्ल्याची एका प्रकारे बांधिलकी आहे असेच वाटले .
आता आम्ही त्या वास्तूकडे उत्सुकतेने पाहू लागलो होतो . किल्ल्याची बांधणी आणि संरचना नवीन आहेत कि जुन्या हे तपासू घेत होतो .
तीन भिंती शाबूत असलेला हा किल्ला नक्कीच २०० किंवा त्याहूनकित्येक वर्ष जुना असू शकतो . आताच्या अवस्थेहून त्या किल्ल्याचा गतवैभवातील स्वरूप कसे असेल हे कळणे कठीण आहे . किल्ल्याचा कचराकुंडी आणि मुतारी असा वापर केल्यामुळे किल्ल्यामध्ये दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य आहे . किल्ल्याच्या भिंतींवर झाडे वाढीस लागली आहेत ज्यांची मुळे किल्ल्यांच्या भिंतींमध्ये खोलवर रुतत चालली आहेत .
निघताना ह्या किल्ल्यावरच बया आणि तांबट ( कॉपरस्मिथ बार्बेट : सिटी बर्ड ऑफ मुंबई ) पाहण्यास मिळाले . रोहन हा पर्यावरण शास्त्राचा विद्यार्थी असल्याने आम्हाला प्राणी , पक्षी , फुलपाखरे ह्यांची त्यांच्या वैज्ञानिक नावांसह माहिती मिळते . " WIKI - रोहन " सोबत असला की ट्रेक मध्ये काही गोष्टी नव्याने माहिती पडतात .
नागाला बंदरकडे जाताना मन थोडे खिन्न होते . किल्ल्याची दुरवस्था पाहून त्या करिता काही तरी करावे असे वाटत होते . फेसबुक वर पोस्ट टाकण्याचा हाच हेतू आहे की किल्ल्याविषयीची माहिती जास्तीत जास्त जणांना कळावी. गायमुखची ही भग्न वास्तू हा एक किल्ला आहे एवढे जरी आपण प्रसिद्ध केले आणि माहिती इतरांना सांगितली तरी त्याच्या संवर्धनासाठी ती उपयोगी ठरू शकते .
सध्या किल्ल्याची स्थिती पाहून त्याचे संवर्धन होऊ शकते का ह्या बद्दल आम्ही विचार करत आहोत . सध्या पूर्वार्ध लिहित आहे, श्री कृपेणे जर किल्ल्याच्या संवर्धनाबद्दल काही करता आले तर उत्तरार्धात अजून माहितीची नोंद नक्कीच करेन . गायमुख किल्ल्याच्या भेटी वेळी आलेला अनुभव खाली नमूद करत आहे .
![]() |
Gaumukh Fort : Unfortunately in Very Bad Condition (Front Elevation) गायमुख किल्ला |
दिनांक : २७ मार्च २०१६ , रविवार
ठाणे जिल्ह्याने अनेक ऐतिहासिक स्थित्यंतरे पाहिली आहेत आणि त्या स्थित्यंतरांचे साक्षीदार आजही आपणास पहावयास मिळतात. काही किल्ले सुस्थितीत आहेत तर काही किल्ले आपल्या शेवटच्या घटका मोजत आहेत . माहितीचा आभाव , इतिहासातील दुर्मिळ नोंदी , छोटे आकारमान आणि जनमानसातील ऐतिहासिक वास्तुं विषयीची उदासीनता हे घटक काही किल्ल्यांच्या दुरावस्थेला कारणीभूत ठरत आहेत . अश्याच काळाच्या ओघात नष्ट होत चाललेल्या " गायमुख किल्ल्याला " भेट देण्याचा योग आला .
ठाणे खाडी परिसरात कल्याण हे महत्वाचे बंदर होते . त्या मार्गे चालणारा व्यापार आणि बंदरांच्या संरक्षणासाठी घोडबंदर , नागला बंदर आणि गायमुख किल्ले बांधण्यात आले . चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांना हरवून घोडबंदर किल्ला जिंकला अशी ठोस माहिती आपणास मिळते . परंतु जवळच खाडीपट्टीला लागून असणाऱ्या गायमुख किल्ल्याचे अस्तित्व हे फारश्या लोकांना माहिती नाही हे एक कटू सत्य आहे .
धवलने ह्या किल्ल्यांची माहिती काढली तेव्हा तिथे काहीही नाही असे ऐकिवात आले . मग आम्ही तिथे भेट द्यायची ठरविले ते त्या किल्ल्यांचे अस्तित्व शोधण्यासाठी !
गायमुख ! ठाणे - बोरीविलीला जोडणाऱ्या घोडबंदर हम रस्त्यावरील खाडी किनारीचे एक गाव !
जागनाथ महादेव मंदिरामुळे हे ठिकाण ठाण्यामध्ये तसे प्रसिद्ध आहे . या मंदिरापासूनच हाकेच्या अंतरावर भग्न आणि दुर्लक्षित अवस्थेतील एक किल्ला आहे… " गायमुख किल्ला " .
गायमुख गावात उतरल्यावर आम्ही रस्त्याशेजारील दुकान मालक आणि काही लोकांना किल्ल्या विषयी विचारले. पण त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सर्वच सांगून जात होते कि त्यांना किल्ल्याबद्दल काही माहिती नाही . किल्ला खाडी लगत असावा असा अंदाज घेऊन खाडी किनारी आलो .लाकडी नौका उभ्या असलेल्या खाडी किनारी आम्हाला पाहता आले ते फिडलर खेकडे आणि मडस्कीपर ! तिथे किल्ल्यासारखे बांधकाम दिसले पण लवकरच समजले कि ती फक्त भरती पासून वाचवण्यासाठी बांधलेली तटबंदी आहे .
![]() |
सर्वजण खाडीकिनारी किल्ला शोधताना .. All are searching the Fort at Creek |
आम्ही अंदाज बांधला कि मूळ स्थानिक लोक आपल्याला पक्के सांगू शकतील कि किल्ला कोणत्या दिशेस आहे ! एका वयस्कर आजींनी आम्हाला ठामपणे सांगितले कि पुढच्या वळणावर किल्ला आहे. त्यांच्या मुलाने ही ह्या गोष्टीला सहमती दिली आणि आम्ही त्या वळणावर आलो ! एक पडीक वास्तू नजरेस दिसली . मनात आले कि हाच किल्ला असणार पण त्याकडे पाहून लगेच अनुमान लावणेही चुकीचे ठरेल अशी तिची अवस्था होती . सचिनने त्या वास्तूला खेटून असलेल्या आणि गेली ६ वर्ष त्याच जागेवर ठाण मांडलेल्या एका रसवंती दुकानात केलेले संभाषण असे होते
सचिन : " यहा कोई किला है क्या ? " .
रसवंती दुकानाची मालकीण : " किला ? इधर कौनो किला नाही है ! "
सचिन : " ये बाजू मे क्या है ? "
रसवंती दुकानाची मालकीण : " मालूम नाही , पुराना घर है और पिछे घाट है "
मी म्हणालो : " क्या है पिछे ? "
रसवंती दुकानाची मालकीण : " घाट है घाट !!! "
तात्पर्य : आम्ही पुन्हा निराश ! पक्की माहिती न मिळाल्याने विग्नेशा आणि अनिकेत म्हणाले कि चला घाट तरी पाहू .
घाटाजवळ चमत्कार घडला असे म्हणणे वावगे ठरणार नाही . ती पडीक वास्तू किल्लाच आहे असा दुजोरा तिथे पाणी भरत असणाऱ्या एका वयस्क काकूंनी दिला . आमचे बोलणे चालू असतानाच एक वयस्क गृहस्थ तिथे आले आणि त्यांनी खूप चांगली माहिती सांगितली . गायमुख हा किल्ला सागरी व्यापार आणि वाहतूक नियंत्रणासाठी बांधला होता . कर वसुली साठी हि त्याचा उपयोग केला जाई . घोडबंदर रस्ता रुंदीकरण करताना किल्ल्याचा काही भाग नष्ट झाला असे ते म्हणाले . किल्ल्याच्या बाजूला एक पाण्याचा स्त्रोत होता आणि ते पाणी एका गायमुखातून बाहेर यायचे म्हणून त्या गावास आणि किल्ल्यास गायमुख असे नाव पडले . पाण्याचे ते टाके आता अस्तित्वात नाही पण त्या काकांनी आम्हाला ती जागा दाखवली जिथे पाण्याचे टाके होते . वयाची ४० वर्ष येथे व्यथित केलेल्या काकांची आणि किल्ल्याची एका प्रकारे बांधिलकी आहे असेच वाटले .
आता आम्ही त्या वास्तूकडे उत्सुकतेने पाहू लागलो होतो . किल्ल्याची बांधणी आणि संरचना नवीन आहेत कि जुन्या हे तपासू घेत होतो .
![]() |
टीम पाऊल : सचिन लांडे , रोहन भगत , विग्नेशा पटेल , अनिकेतराव रोकडे , नरेंद्र लाखण ( डावीकडून उजवीकडे ) , फोटो : धवल भंगाळे |
![]() |
Finally we got assurity about Gaimukh Fort |
निघताना ह्या किल्ल्यावरच बया आणि तांबट ( कॉपरस्मिथ बार्बेट : सिटी बर्ड ऑफ मुंबई ) पाहण्यास मिळाले . रोहन हा पर्यावरण शास्त्राचा विद्यार्थी असल्याने आम्हाला प्राणी , पक्षी , फुलपाखरे ह्यांची त्यांच्या वैज्ञानिक नावांसह माहिती मिळते . " WIKI - रोहन " सोबत असला की ट्रेक मध्ये काही गोष्टी नव्याने माहिती पडतात .
![]() |
तांबट ( Coppersmith Barbet : City Bird of Mumbai ) |
![]() |
फिडलर खेकडे आणि मडस्कीपर : Fiddler Crab and Mud Skipper |
![]() |
बया : Baya Wavear |
नागाला बंदरकडे जाताना मन थोडे खिन्न होते . किल्ल्याची दुरवस्था पाहून त्या करिता काही तरी करावे असे वाटत होते . फेसबुक वर पोस्ट टाकण्याचा हाच हेतू आहे की किल्ल्याविषयीची माहिती जास्तीत जास्त जणांना कळावी. गायमुखची ही भग्न वास्तू हा एक किल्ला आहे एवढे जरी आपण प्रसिद्ध केले आणि माहिती इतरांना सांगितली तरी त्याच्या संवर्धनासाठी ती उपयोगी ठरू शकते .
![]() |
Jaganath Mahadev Temple : Gaumukh |
![]() |
होड्या : गायमुख बंदर |
![]() |
गायमुख किल्ला : वाईट अवस्थेत |
![]() |
उरल्या फक्त तीन भिंती ! |
स्थान ( कसे जाल ? ) : ठाणे पासून बोरीविलीला जाताना घोडबंदर रोड लागतो . घोडबंदर रोड मार्गावर " गायमुख " नावाचा थांबा आहे . एस टी आणि टी एम टी च्या बस येथे थांबतात .
मस्त नरेंद्र ��
ReplyDeleteTHANKS DEAR ANIKET. THANKS FOR UPDATING THE DATES
Deleteसुरेख लेख नरेन्द्र...
DeleteThanks for sharing with us..
Looking forward to read more info regarding Gaymukh and blogs from you...
Thanks Shreyas..Lets add some more information. It will helpful for information seekers like us. 😃
Deleteधन्यवाद दादा, खूपच छान पद्धतीने तुम्ही गडाची माहिती दिलीत
ReplyDeleteसर्वप्रथम अभिनंदन तुम्ही कोणतीही वास्तू पाहताना त्याचे वेगवेगळ्या कोनातून भरपूर फोटो काढा म्हणजे परत जायला लागत नाही. आणि हे संदर्भ पुढे उपयोगाला येतील तसेच तुमच्या ग्रुप चे वस्तू संग्रहालय सुरू करा पण रजिस्टर करा कारण काही वस्तू अशाच ठेवता येत नाही. म्हणजे तुमच्या कडे एकेक वस्तू गोळा होतील आणि तुमच्या कष्टाचे आयुष्याचे सार्थक झाल्या सारखे वाटेल
ReplyDeleteजय हिंद जय महाराष्ट्र